भाग्य होतं म्हणून जन्म मनुष्याचा घेऊन आलो,
आई-वडिलांच्या आशीर्वादाने लवकरचं मोठा होऊन गेलो.
लहानपण जणू लवकरचं निघून गेलं,
होत गेल्या चुका,शिकून त्यातून समजदार होता आलं.
उतरलो या मोठ्या स्पर्धायुक्त जगात,
येईल का मला यश ही भीती होती मनात.
छोट्या गावामधून मोठ्या शहरात आलो,
स्वतःच्या इच्छेला वाव देण्यासाठी इंजिनियर बनून गेलो.
वयाची २०वी लवकरचं येऊन गेली,
मोठं होऊन पैसे कमवायची जाण होऊ लागली.
लोकांची मने जिंकून घ्यायची मनाला लागली आस,
आयुष्यात मोठी स्वप्न साकारेल आहे स्वतःवर विश्वास.
-तेजस संजय पाटील.
Comments
Post a Comment